अष्टपैलू 'अभियंता'.
---------------------
जिद्द,चिकाटी,मेहनत या ञिसूञीचा खरा अर्थ खूपचं 'व्यापक' आहे. तो अर्थ माणसाला 'अनुभवातून' समजत असतो. पण या तिहेरी 'गुणां'चा उपयोग करून आपलं 'आयुष्य' सुकर केलेला आवलिया म्हणजे अतिश ओव्हाळ होय. मनात आणलं तर 'माणूस' काहीही करू शकतो. हा 'सिध्दांत' त्याने खरा करून दाखविला आहे. तो नेहमी म्हणतो की, यशस्वी होण्यासाठी 'सकारात्मक' असायला हवं. आयुष्यातल्या सुख दु:खाच्या अनेक प्रसंगात त्याचा 'बाणेदार'पणा जवळून बघता आला.
शिक्षणासाठीचा त्याचा 'संघर्ष' आम्ही लहान वयापासून पाहतो आहोत. 'इंजिनिरिग'ला असताना अतिश सायकलहून महाविद्यालयात जायचा. खरं तर घर ते महाविद्यालय १० किलोमीटरचं अंतर तो भर उन्हात पावसात पार करायचा. रोज २० किलोमीटरचा ठरलेला प्रवास. पण त्यात त्याने कोणताही 'संकोच' बाळगला नाही. किंवा घरी तक्रार सुध्दा केली नाही. दहावी किंवा बारावी पास होण्या अगोदर फँशनबाज गाडी द्यावी लागते.हे घरच्याकडून 'कबूल' करून घेणारा आजचा काळ. या काळात अतिशचा 'सायकल' प्रवास बघून गावात प्रत्येकाला त्याचा 'हेवा' वाटायचा. आहे त्या परिस्थितीत लढलं पाहिजे. हा त्याचा बाणा आहे. अनेक 'अडचणी' वाट्याला आल्या. पण त्याने कधीचं बाऊ केला नाही.
कोणताही शैक्षणिक 'वारसा' घरात नसताना त्याने माञ शिक्षणाची कास धरली. त्याच्या शिक्षणाची टक्केवारी किंवा पदवीचा अर्थ अडाणी असल्यामुळे आई व वडिलांना कळत नव्हता. आमच्या सारख्या त्याच्या मिञांना ते विचारायचो तेव्हा आम्ही समजावून सांगायचो. आपला मुलगा किंवा मुलगी पाचवी सहावीला गेल्यापासून त्याच्या मागे 'अपेक्षाचं' आेझं लादणार्यां पालकांमध्ये व अतिशच्या आई वडिलांमध्ये 'फरक' आहे तो मानसिकतेचा. अडाणी असूनही त्याच्या आई वडिलांनी त्याला 'मुक्तपणे' संचार करू दिला. त्याला हवा तो विषय घेऊ दिला. त्याला हव ते करू दिलं. महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं 'स्वातंञ्य' दिलं. पण अतिशनंही कधीचं स्वातंञ्याचा 'स्वैराचार' केला नाही. त्याने नेहमीचं आई वडिलांचा सोबतचं नातेवाईक, पाहुणे व मिञांचा आदर केला. आपुलकीनं 'संवाद' साधला आहे. अतिश विषयीचं आणखी एक नोंद घ्यावी लागेल की, कोणतीही 'शिकवणी' किंवा सोकॉल्ड 'क्लास' न लावता तो 'गेट' परीक्षा पहिल्या प्रयत्नात 'उत्तीर्ण' झाला आहे. आपल्या 'जिद्दी'च्या बळावर पुढील शिक्षणासाठी राज्याच्या 'राजधानीत' धडक मारली. मुंबई नगरीच्या 'धावपळीत' तो सामिल झाला. व्ही.जी.टी.आय. मध्ये त्याने शिकण्या बरोबरचं शिकवणं सुरू केलं. त्याच्यातला 'शिक्षक' आता अभिव्यक्त व्हायला लागला होता. विषय 'समजून' देण्याची त्याची 'पध्दत' सगळ्यांना आवडत होती. मुंबईनं त्याला खुप काही शिकवल्याचं तो नेहमी सांगत असतो.
दोन वर्षांच एम.टेक चांगल्या गुणांनी पूर्ण करून तो पुण्यात परतला. पुण्यात 'आमच्या' भेटी गाठी वाढल्या. मी पुण्याबद्दल तर तो मुंबईबद्दल बोलायचा. दिवस दिवसभर आमच्या 'गप्पा' रंगायच्या. अन अचानक त्याने मांजरी हडपसरचं अण्णासाहेब आवटे इंजिनिरिग कॉलेज जॉईन केलं. तिथं 'शिकवू' लागला. रोज नवनवीन 'प्रयोग' केल्याने त्याला माननारा विद्यार्थी वर्ग निर्माण झाला होता. त्याच्या तासाला बसावं असं वाटणार्यांची 'संख्या' वाढत होती. त्याची शिस्त फार कडक होती.विद्यार्थ्यांना तो खडे बोल सुनवायचा.लवकरचं तो लोकप्रिय 'प्राध्यापक' झाला. तो तिथे स्थिरावतो आहे. असं वाटत असतानाचं एका दिवशी त्याचा 'फोन' आला. कॉलेजला ये असं सांगितलं. मी तडक निघालो. पोहचलो व चौकशी करून त्याचा वर्ग शोधून काढला. पाहतो तो तर काय वर्गात चारचं पोरं. सगळा वर्ग या 'पट्यानं' हाकालून दिलेला. कारण काय तर 'प्रोजक्ट अनकप्लिट'. मला वाटू लागलं असा 'मास्तर' असला पाहिजे. गंडगंज फि भरली म्हणजे आपण वाटेल तसं वागू हि भावना निर्मांण झालेल्या इंजिनिरिंगवाल्यानां कुणीतरी सुनावणारा आहे. याचं 'समाधान' मला वाटत होतं. तो याचं क्षेञात 'मोठा' व्हावा असं वाटत असतानाचं जरा खाली जाऊन येऊ असं तो म्हणाला. आम्ही नेहमीप्रमाणे आवटे कॉलेजच्या मागे 'टपरीवर' गेलो. तिथं आमच्या नेहमीच्या चायवाल्याकडून अतिशनं 'चहाची' आँर्डर दिली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. चहा आला आणि अतिशनं बॉम्ब टाकला. मी 'राजीनामा' दिलाय. अगदी थंडपणे त्यानं सांगितलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सॉलिट 'टरकलो' होतो. पण अतिश तेवढाचं 'कूल' होता. इन्फँक्ट त्याच्या चेहर्यांवर कधी नव्हे एवढा आनंद दिसत होता. अतिशचं ते ठेवणीतलं हासणं. अरे, पण असं तडकाफडकी? पुढं काय? माझा टिपकल मध्यमवर्गीय प्रश्न. माहीत नाही, अतिशचं बेफिकर उत्तर. अरे खरचं माहीत नाही. थोडा दिवस मस्तपैकी 'ब्रेक' घेतो.चेहर्यांवरील हास्याची रेषा बिघडू न देता तो सांगत होता. काहीही 'हातात' नसताना अतिशनं ए.जी.आवटे कॉलेज सोडलं. असा निर्णय घ्यायला सॉलिड 'डेअरिंग' लागतं बॉस.
पुढे तो 'फोर्स मोटार्स'ला जॉईन झाला. तिथंही तो नवनवीन 'प्रयोग' करत राहिला. त्याच्यात लपलेला 'इंजिनिअर' आता वेगळ्या स्वरूपाचं इंजिनिरिंग करत आहे. कुणी अडलं नडलं तर अतिशचा 'आधार' तिथेही लोकांना वाटतो आहे. माञ त्याच वेळी 'सिनियर' म्हणून तो 'कडक' वागतो. म्हणजे मैञी बिञी सगळं ठिक, पण आधी नेमून दिलेलं 'काम' पार पाडायचं. कामचुकारपणा त्याला आवडत नाही. अगदी तुम्हाला सातच्या शिप्टला वेळेवर येणं जमत नसेल किंवा 'दांडी' मारायची असेल तर कसं बिनधास्त सांगायचं. पण 'खोटं' बोललेलं किंवा टंगळमंगळ केलेली त्याला अजिबातचं खपत नाही. कुण्याच्या खांद्यावर हात ठेऊन काम काढून घ्यायचं, कुण्या शहाण्याला किती 'शब्दांचा' मार द्यायचा आणि कुणाला चौदावं रत्न दाखवून काम करायचं, याचं त्याचं असं स्वत:चं 'लॉजिक' आहे. त्यामुळं सगळ्यांच्याच मनात त्याच्याबद्दल एक 'आदरयुक्त' दरारा आहे.
अतिशची धडाडी पाहूनचं 'फोर्स मोटार्स'ने त्याच्याकडे महत्त्वाची धुरा सोपविली आहे. तिथं तो स्वता:ची 'ओळख' निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.
दुसर्यांचं कौतुक करण्यात तो नेहमी आघाडीवर असतो. मी चिंचवडला कै.गोपीनाथ मुंडे राज्यस्तरीय विजेता ठरलो. तेव्हा त्याला झालेला आनंद विस्मरणीय आहे. माझ्या वक्तृत्वावर त्याचं फारचं प्रेम. माझ्या सभा, व्याख्यानांना तो नेहमी हजर असतो.
आमच्यातला समान धागा म्हणजे क्रिकेटप्रेम. पण तो आमचा फोर्थ अम्फायर. त्याला जगातल्या सगळ्या क्रिकेट टिमचे खेळाडू माहीत आहेत. त्याची क्रिकेटविश्वा विषयीची माहीती अफाट आहे. आम्हाला सांगितलेला त्याचा अंदाज चुकतचं नाही. परवा दक्षिण अफ्रिकेसोबत आपण जिंकू. हा त्याचा 'विश्वास' खरा ठरलाय. सामन्यानंतर मी 'फोन' केला. तेव्हा आता 'करडंकचं' भारताचा. असं तो म्हणाला आहे. त्याचं हे 'निरीक्षण' खरं ठरेल यात शंकाचं नाही. वास्तविक पाहता आमचं 'क्रिडाप्रेम' हे फक्त क्रिकेट पुरत मर्यांदित. पण अतिश त्याला अपवाद आहे. तो क्रिकेट इतकाचं फुटबॉल व टेनिसचा चाहता आहे. पुन्हा तोच प्रकार तो जगातल्या सगळ्या फुटबॉल व टेनिसपट्टूना ओळखतो. तो लहानवयात क्रिकेट खेळायचा. 'जाग्याहून सिक्स' मारणारा खेळाडू अशी त्याची ओळख आमच्या गावात आहे.
स्वयंपाक करण्यात अतिश हात कुणीही धरू शकत नाही. त्याने बनविलेली 'भाजी' एखादा आचारी लाजेल अशी असते. चिकन 'दम बिर्यांनी' बनविण्यात त्याचा विशेष 'हातखंडा' आहे. असा कोणताचं मिञ नाही की, ज्याने अतिशच्या हातची 'बिर्यांनी' खाल्ली नसेल.
त्याच्यात 'संवेदनशील' मनाचा माणूस लपला आहे. लहान थोरांना तो 'आदर' देत असतो. मैञीची मनस्वी जाण असणारा अतिश 'मिञांना' फार जपतो.
खरं तर इंजिनियर हे व्यावहारिक व व्यवासाईक असतात. त्यांना भाव भावना नसतात. असा आपला समज आहे. पण हा समज 'चुकीचा' असल्याचं अतिश आणि त्याच्या मिञांनी दाखवून दिलं आहे. आम्ही केवळ 'यंञाची' किंवा 'मशिनची' भाषा समजत नाही. तर 'समाजाची' व 'माणुसकीची' भाषा समजतो. याचं भावनेतून 'समविचारी' मिञांना घेऊन 'ममत्व' फाऊडेशन ची स्थापना केली. या फाऊडेशनच्या माध्यमातून समाजाचा 'चेहरा' बदलण्याचं पाऊल ते टाकताहेत. दुखितांचे 'अश्रू' पुसताहेत. अंधाराला 'आव्हान' देताहेत. मनाच्या 'समाधाना'साठी झटताहेत. समाजात 'उजेड' करण्यासाठी लढताहेत......
माणूस म्हणून तो 'ग्रेट' आहेचं. पण मिञ म्हणून तर भलताचं 'गोड' आहे. परवा ऑफिसच्या कामानिमित्त चेन्नई व इंदौरला 'विमाना'नं जाऊन आला आहे. अतिशने मला 'फोन' करून विमानाने जात असल्याचं सांगितलं. आणि मी भूतकाळात रमलो. तासाला उशिर होईल म्हणून जरा लवकर सायकलहून कॉलेजला निघणारा १५ वर्षांपूर्वीचा अतिश आठवला. सायकलहून इंजिनिरिंग पूर्ण करणारा हा माणूस 'विमाना'तून प्रवास करतोय. याचं 'समाधान' वाटलं. त्याच्याविषयीचा 'आदर' अधिकचं वाढला.
शहरात राहूनही त्याचं 'माती' आणि 'शेती'वर खूप प्रेम. मी झोपत असतानाचं 'फोन' करून पाऊस, पाण्याबद्दल हमखास विचारणारं.
सर्वांना समजून घेणारा. मिळून मिसळून राहाणारा अवलिया. त्याचं नाव अतिश.
त्याच्या सोबतच्या कितीतरी 'आठवणी' मनात घर करून बसल्या आहेत.........!!
हे सगळं लिहीण्याचं कारण म्हणजे या गोड, मितभाषी अष्टपैलू अभियंत्याचा आज 'वाढदिवस' आहे.
अतिश, दोस्ता तुझ्या सोबतचा स्नेह व मैेञी अशीचं राहिलं.
तुझी सारी 'स्वप्न' व 'इच्छा' आणि 'आकांक्षा' पूर्ण व्हाव्यात. हिचं सदिच्छा........
मिञा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.👔💍🎂🍧
ता.क.- आता दम बिर्यांनीची पार्टी कधी देणार.
©धनंजय मोहन झोंबाडे.
हिंदी विभाग.
साविञीबाई फुले विद्यापीठ. पुणे.
---------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें