रविवार, 13 जून 2021

भूमिका घेणारा माणूस...

पुणे विद्यापीठात एम.ए ला असताना प्रा.डॉ.भगवान गव्हाडे सर होते. ते आधुनिक गद्य, आधुनिक पद्य आणि भारतीय साहित्य शिकवायचे. शिकवताना सतत गझलेचा किंवा चित्रपटांचा संदर्भ द्यायचे. त्यांचा आवाज सुध्दा घरंदाज गायकी प्रमाणे मंजुळ आणि सुरेख होता. मनोरंजातून साहित्य शिकवण्याची त्यांची कला विद्यार्थी वर्गावर प्रभाव टाकत होती. त्यामुळे ते विभागातील शिक्षकांसह ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके झाले होते. त्यात भर म्हणजे विद्यापीठाच्या 'फँकल्टी हाऊस' ला ते एकटेचं राहायचे. (त्यांचे कुटुंब औरंगाबादला होते.) त्यामुळे रात्री-अपरात्री त्यांच्या सोबत आमचे दिग्दर्शक मित्र जयशिल मिजगर, प्रमोद आव्हाड, Kumar Muthe  प्रफुल्ल कांबळे Nitin Mane  Sandeep Kale  Manohar Lote Dnyaneshwar Bagnar Kiran Sonwalkar Satish Harpade अशी मोठी मैफील रंगायची अगदी खुलके बात...खुल्लम खुल्ला इजहार..सर ही रोमँटिक होऊन गझला म्हणायचे. साहित्य, समाज, कला, मनोरंजन, चळवळ, अभ्यासक्रम, प्रेम, चित्रपट, गाणी अशी चौफेर चर्चा रंगायची. विद्यार्थी आणि शिक्षक  याच्या पलिकडचं नातं गव्हाडे सर आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं होतं. कोणत्याही विद्यार्थ्यांविषयी सरांच्या मनात आपुलकी आणि जिव्हाळा जाणवायचा. विद्यापीठाच्या बाहेर अनेक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलनात सरांसोबत मी आणि जयशिलनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अगदी शनिवार-रविवारचे चित्रपट पाहाण्याचाही योग अनेकदा जुळून आला. 'कविता' करण्यात त्यांचा विशेष हातखंडा. त्यातूनचं 'आदिवासी विमर्श' हा कविता संग्रह आकारास आला. कितीतरी संगोष्टी आणि चर्चासत्रे मी आणि लाडके मित्रवर्य  प्रा.डॉ.अरूणकुमार सोनकांबळे, Ravindra Nirgude Patil  यांनी गव्हाडे सरांसोबत अनुभवलीत. त्यांची साहित्यिक मांडणी नेहमीचं भावली. पिशपाँन्ड, ट्रँडिशनल डेज, गँदरींग मध्ये तर सरांची फुल्ल टू धम्माल. 'चलाओं ना नैनोसे बान रे...' या गाण्यावर प्राँ.डाँ.महेश दवंगे आणि गव्हाडे सरांनी Devram Dagale  ला सोबत घेऊन केलेला डान्स अजूनही प्रत्येकाच्या मनात आहे. प्रो.डॉ.तुकाराम पाटील सर सेवानिवृत्त होताना गव्हाडे सर खूपचं भावूक झाल्याचेही आठवतंय. पुढे गव्हाडे सर पुणे विद्यापीठ सोडून औरंगाबादला 'घरवापसी' करीत असताना लिपीक शिवाजी कोकणे आणि Abhijeet Chobhe prakash Prakash M. Maghade  सुध्दा  भावूक झाले होते. एम.ए च्या निरोप कार्यक्रमसाठी लघुपट बनविताना गव्हाडे सरांचे बहुमोल मार्गदर्शन जयशिल नि मला मिळाले होते. त्यामुळेचं पुढे काही लघुपट करता आले. जयशिलने तर पुढे ग्रामीण प्रेमाचा कानोसा घेणारा ह्रदयस्पर्शी 'पाटील' नावाचा मराठी सिनेमा केला. असो तर....
गव्हाडे सरांच्यामुळे त्या वयात 'दुनियादारी' कळाली. ते नेहमी 'आजचा दिवस माझा' म्हणत सकारात्मकता शिकवित राहिले. त्यामुळे ते आम्हाला आमचे 'मितवा' वाटायचे. 'क्लासमेंट' आणि 'फ्रेंडस'ची जाणीव सरांनी आम्हाला करून दिली. त्या बळावरचं काहींनी 'प्यारवाली लव्हस्टोरी' साकार केली. 'पुणे मुंबई पुणे' हा प्रवासही त्यांच्या सोबत करता आला. त्याचं प्रश्नांशी 'धडाकेबाज' भिडणं मनाला नवी उमेद देऊन गेलं. अभ्यासाचा 'टायमपास' करू नका, नाही तर 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' करावा लागेल, याचीही जाणीव सरांमुळे झाली. आयुष्याचा 'नटरंग' होऊ द्यायचा नसेल तर 'आयत्या घरात घरोबा' होऊ नका, असा सल्लाही ते देत होते. 'अशी ही बनवाबनवी' टाळली तर माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठ्ठा होतो, यावर त्यांची विशेष श्रध्दा आहे. वाचण्या- लिहण्यातले संदर्भ जर जगण्यात आणता आले तर आयुष्य फारचं सुंदर वाटायला लागतं. असं त्यांनी खूपदा सांगितलंय. आम्हाला साहित्याकडे पाहाण्याची वेगळी नजर प्रो.डॉ. तुकाराम पाटील, प्रो.डॉ.भालेराव  Sadanand Bhosale Balasaheb Sonawane शशिकला राय, Prerana Ubale प्रा.डॉ.महेश दवंगे यांनी दिली पण काव्यातून साहित्याकडे बघण्याची कला गव्हाडे सरांमुळे मिळाली. त्यांच्या सहवासाने आमच्या जगण्यात  'सैराट'पणा आला. अगदी जगणंचं 'लय भारी' वाटू लागलं. सरांचा सहवास असाचं मिळत राहावा असं वाटत असतानाचं त्यांनी 'घरवापसी'चा अनाकलनीय निर्णय घेतला. आम्ही आदरापोटी त्यांची 'मन की बात' समजून घेतली. आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. तरीही संपर्क कायम आहे. सुख-दु:खाच्या अनेक गोष्टी, आयुष्यातले खचखळगे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येतात. त्यांच्याशी बोललं की मन हलकं होतं. आजही ते त्याचं आपुलकी आणि प्रेमातून सल्ले देतात. मार्गदर्शन करतात. विचारपूस करतात. मधल्या काळात 'कोरोना'शी दोन हात करण्याची लढाई ते निष्टेनं अगदी चिवटपणे लढले. लोकांचे प्रबोधन करीत राहिले. मदत करीत राहिले. तसेच 'माझं कुटुंब माझी जबाबदारी'ही सांभाळत राहिले. असा हा मुलखावेगळा माणूस.भूमिका घेणारा मास्तर. वास्तव मांडणारा कवी. जगतो तेचं बोलतो म्हणणारा वक्ता. आमच्या आयुष्यात आहे. याचा हेवा वाटतोय. तर या अवलिया माणसाचा आज वाढदिवस आहे. त्यांची सगळी स्वप्ने, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. त्यांच्यातला माणूस असाचं गोड, मनस्वी आणि निखळ राहावा. आणि हो, आमच्या डोईवरचा हात असाचं कायम राहावा याचं सदिच्छेसह आदरणीय प्रा.डॉ.भगवान गव्हाडे Ajay Gavhade  सरांना वाढदिवसाच्या बक्कळ, मोक्कार, जबराट आणि ट्रकभर शुभेच्छा....!!
#जुगजुगजिओ
#सालगिराहमुबारक
#हँप्पीवालाबड्डे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें