शनिवार, 22 अप्रैल 2017

माणसांतला 'मास्तर'....!!!

सााविञीबाई फुले पुणे विदयापीठाच्या हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक व आमचे लाडके,वंदनीय गुरू,श्रध्दीय मा.प्रा.डॉ.सदानंद भोसले सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्तवाची घेतलेली शाब्दिक 'दखल' खालीलप्रमाणे......!!!!!
----------------------
 मातीशी नातं असणारा प्राध्यापक
------------------------
समाजजीवन सतत आंदोलित होत असते. सारं काही बिघडलं आहे,असे वाटत असताना सकारात्मक सृजनाचे धुमारे फुटताना दिसतात.त्यामुळे समाज एक पाऊल मागे जातो आहे,असे वाटत असतानाचं तो दोन पावले पुढेही सरकलेला दिसतो.फक्त सृजनाची दखल आपल्याला घेता आली पाहिजे. सदानंद भोसले यांचे कामही असेचं समाजाला दोन पावले पुढे नेणारे,सकारात्मक बळ देणारं, उत्साह वाढविणारं व 'माणुसकी'ची जाणीव करून देणारं आहे. 'देशमुखां'चा बालेकिल्ला म्हणून ओळख असणार्यां लातूर जिल्हयातील चाकूर तालुक्यातलं 'वाघोली' हे त्यांचं जन्मगांव. लहानपणापासूनचं गरीबीशी दोन हात करण्याचा त्यांचा प्रवास वाखाण्याजोगा आहे. समाज व परिस्थितीशी लढण्याचं 'बाळकडू' त्यांना घरातूनचं मिळालं. जिद्द,चिकाटी,अभ्यासू,कणखर,प्रामाणिक व मेहनती हे गुण अगदी बालपणापासूनचं. वाचन,चिंतन व काहीतरी करून दाखविण्याची 'धडपड' त्यांना स्वस्थ बसूचं देत नव्हती.म्हणूनचं त्यांनी शिशकी पेशात प्रवेश केला. आपले काम व लेखणीच्या बळावर लवकरचं ते 'प्राध्यापक' झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेचं नाही. बांभूळगांव,नाशिक,औरंगाबाद,कोपरगांव अशा ठिकाणच्या महाविद्यालयात त्यांनी आपल्या 'जाणीवा संपन्न शिशकाची' चुणूक दाखवून दिली आहे. त्याचं वेळेस त्यांनी समाजातील दु:खितांची बाजू मांडली. अन्यायाला वाचा फोडली. शोषितांना आधार दिला. अनाथांना मायेनं जवळ घेतलं. आणि शञूवरही तितकचं प्रेम केलं हे विशेष. वयाच्या २२ व्या वष्री प्राध्यापक म्हणूनआगमन केलेल्या भोसले सरांचं विश्वचं 'प्राध्यापक'मय झालं आहे. यात शंकाचं नाही. आयुष्याच्या खचखळग्यात सुध्दा या माणसानं हार कधी मानलीचं नाही. तरूण पणात आलेल्या सगळ्या जबाबदार्यां तितक्याचं आनंदाने त्यांनी निभावल्या आहेत. कमी वयात अनेक मान-सन्मान  मिळूनसुध्दा या माणसाचे पाय सदैव जमिनीवरचं आहेत. म्हणूनचं की काय त्यांना आजप्रयंत महत्त्वाची 'पद'मिळाली आहेत. त्यांच्यातल्या 'सजग माणसानं'ने नेहमीचं 'वंचितांची बाजू' घेतली आहे. अन्याय व अत्याचारावर कटूर शब्दप्रहार केला आहे. काळानुसार शिकवण्याच्या पध्दतीत बदल होत गेले. आणि 'महाविद्यालयात'त प्रयोगशील काम करणारा हा माणूस 'विद्यापीठा' वरही 'अधिराज्य' गाजवू लागलायं. आपल्या माणसाचं,विद्यापीठाचं नावं झालं पाहिजे अशी भावना बाळगणार्यां या माणसानं 'सेट नेट'च्या काय्रशाळेचा पाया रोवून  आव्हानालाचं 'टक्कर' दिली आहे. विद्याथ्याचा आधारवड होऊ पाहाणारा त्यांच्यातला माणूस प्रेमळ व तितकाचं  हळवा सुध्दा आहे. शिशकी पेशातली व मुस्कटदाबी हा त्यांचा नेहमीचं 'चिंतेचा' विषय आहे.  शिकवणं हि एक चळवळ आहे.त्यांचा धंदा होऊ देणारं नाही? असा निश्चय त्यांनी केला आहे. माणसांना हक्क व आधिकार मिळवून देण्सासाठी धडपड करणारा त्यांच्यातला  लढवय्या काळालाचं आव्हान देतो. व कुसमाग्रजांच्या शब्दांत म्हणतो की..............
'मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन
नुसतंचं लढ म्हणा.....!!
शिकवण्यानं त्यांना समृध्द केलेयं.अनेक अनुभव आले.पण मुठभर भाकरीसाठी त्यांनी 'स्वाभिमान' कधी सोडला नाही. माणसं जोडणं हा त्यांचा उपजत गुण. संवादानं प्रश्न सुटतो. यावर त्यांचा दृढ विश्वास.त्यांच्यातला करारी माणूस पाहाताना वामन निंबाळकरांच्या ओळी सतत आठवतात......................
'आयुष्य आमचं रोजचं
चिंध्या झालंयं,
आमच्या इतकं
कुणी फाटलचं नाही,
सोईनुसार सारेचं बदलले,
आम्ही माञ शब्दचं,
दुकान कधी थाटलंचं नाही.....
त्यांची धडपड सतत नवा अध्याय मांडत असते.माणूसकी जपत असते. संवादाची भूमिका घेत असते.त्यांना या वाढदिवशी नवी उमेद मिळवी.त्यातून त्याचं काम उजळून निघावं. त्याच्यातला जागरूक प्राध्यापक असाचं राहावा अशी अपेशा व्यक्त करतो. त्यांच्या आयुष्याचा सारा लेखाजोखा बाबा आमटेंच्या शब्दात माडतांना इतकचं म्हणता येईलं की,
श्रृंखला पायी असू दे
मी गतीचे गीत गाई
दु:ख उधळावयास आता
आसवांना वेळ नाही....!!!
✒ धनंजय मोहन झोंबाडे
      मु.पो. सांजा. ता व जि.
      उस्मानाबाद - ४१३५०१
     
💐💐💐🙏🙏🙏💐💐zombadedhanu98@gmail.Com